LAKSHYAVEDH by RANJEET, DESAI

LAKSHYAVEDH

By

Description

शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग म्हणजे स्वतंत्र कादंबरीचा विषय. या चरित्राइतके सर्वांगसुंदर चरित्र आजवर इतिहासाने पाहिलेले नाही. असा या चरित्राचा लौकिक. बारा मावळांत स्वराज्याचे रोपटे रुजते न रुजते, तोच अफझलखानाचे संकट अवतरले. वाईपासून प्रतापगडापर्यंतच्या हिरव्यागर्द रानावर राजकारणाचा पट मांडला गेला. चढे घोडियानिशी राजांना पकडून नेण्याची अफझलखानाची गर्वोक्ती होती; आणि खानास मारल्याविना राज्य साधणार नाही, हे राजे पुरे जाणून होते. या दोन राजकारणधुरंधरांनी खेळलेला डाव म्हणजेच ‘लक्ष्यवेध’.

More RANJEET, DESAI Books